Sunday, December 14, 2008

स्वामी रामदेव म्हणतात


गोळीचे उत्तर गोळीनेच द्यायला पाहिजे. मी योगाचा प्रचारक असलो तरी दहशतवादाला योगाने उत्तर देता येत नाही, बंदुकीच्या गोळीला बंदुकीच्या गोळीनेच उत्तर द्यावे लागते. आपल्या देशात येऊन निरपराधांची निर्दयीपणे ़हत्या करणाऱ्यांवर तेवढीच कठोर कारवाई केली पाहिजे.
संकटाच्या या काळात प्रखर राष्ट्राभिमानी लोकांचे संघटन झालेच पाहिजे. या देशात हिंदू बहुसंख्य आहेत आणि दहशतवादाचा मुकाबला करण्याची ताकद त्यांच्यातच आहे. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हिंदूंची व्होट बॅंक तयार व्हायलाच हवी.
-स्वामी रामदेव
संभाजीनगर, शनिवार दि. 13 डिसेंबर 2008

Tuesday, December 2, 2008

माझी मुलगी प्रज्ञा




माझी मुलगी प्रज्ञा



काही नेते उघडपणे प्रज्ञाच्या समर्थनार्थ पुढे आले नाहीत, त्यामुळे मी अजीबात विचलित झालेलो नाही. कारण माझ्या मुलीने काहीही चुकीचे केलेले नाही. मालेगाव स्फोटात प्रज्ञाचा हात नाही, याची मला 99 टक्के खात्री आहे. एक टक्का यासाठी नाही कारण, गेल्या दोन वर्षांपासून ती साध्वी आहे आणि ती माझ्या येथील घरी आलेली नाही. कारण साध्वीने आईवडिलांच्या घरी यायचे नसते, असा नियम आहे. ती आता मला "पिताजी' म्हणत नाही आणि त्याऐवजी "डॉक्टरसाब' असे म्हणते.
""मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोप ठेवून पोलिसांनी जरी माझ्या मुलीला अटक केली असली, तरी माझी मुलगी निर्दोष आहे, ती असे कृत्य करूच शकत नाही,'' असे तिचे वडील डॉ. चंद्रपालसिंग यांनी "रेडिफ डॉट कॉम' या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
डॉ. चंद्रपालसिंग हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत आणि गेल्या 35 वर्षांपासून ते संघाचे काम करीत आहेत. आपली मुलगी निर्दोष कशी आहे, हे त्यांनी रेडिफच्या शीला भट यांच्याशी आपल्या सुरत येथील निवासस्थानी बोलताना सांगितले.
""साध्वीचे जीवन हेच खरे जीवन आहे असे मला वाटते आणि त्यामुळेच तिला साध्वी होण्यासाठी मी स्वत: प्रोत्साहन दिले. प्रज्ञाला खोट्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे आणि या खोटारडेपणाचा आम्हा सर्वांना खूप त्रास होत आहे. साध्वी झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांत तिने "जय वंदे मातरम्‌' ही संघटना स्थापन केली. ज्या महिलांचे, दिशाभूल करून धर्मांतरण करण्यात आले, त्या महिलांना मदत करणे, ज्यांच्या दाम्पत्य जीवनात वाद आहेत, त्यांना मदत व मार्गदर्शन करणे अशी कामे ती या संघटनेमार्फत करीत आहे. संपूर्ण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परिवार हा तिचा परिवार होता.''
पोलिस हे राजकीय पक्षांच्या दबावाखाली काम करीत आहेत, असे त्यांनी पोलिसांबाबत विचारले असता सांगितले. ""पोलिसांना राजकारण्यांचे 85 टक्के ऐकावेच लागते. नंतर ते माफी मागतात आणि सांगतात की, आम्हाला असे करण्यास भाग पाडण्यात आले होते.
आणिबाणीच्या काळात हे सर्व मी अगदी जवळून बघितले आहे. पोलिसांच्या यादीत माझे नाव सगळ्यात वर होते. मी देशविरोधी आहे, महात्मा गांधी यांचा वध करणाऱ्या संघटनेशी माझा संबंध आहे आणि मी समाजातील सौहार्द नष्ट करीत आहे, असा आरोप माझ्यावर ठेवण्यात आला होता. त्या वेळी मी भूमिगत झाल्याने मला अटक झाली नव्हती,'' असेही डॉ. सिंग यांनी सांगितले.
""प्रज्ञाजवळ मोटारसायकल होती हे आम्ही नाकारत नाही. साडेचार वर्षांपूर्वी भोपाळ येथे तिच्या गाडीची कागदपत्रे आणि तिचे पदवी प्रमाणपत्र हरविले होते. तिला एका ऑटोरिक्षाने धडक दिल्यानंतर तिची पर्स हरविली होती, त्या वेळी तिच्या डोक्यालाही मार लागला होता. आजारातून बरे झाल्यानंतर तिने मोटारसायकल विकण्याचे ठरविले. ही गोष्ट अभाविपतील तिच्या सहकाऱ्यांना कळली. एक वर्ष जुनी तिची मोटारसायकल चांगल्या स्थितीत होती आणि तिची किंमत 43 हजार रुपये होती. गाडीचा सौदा झाला. ज्या मनोज शर्माने गाडी घेतली त्याने केवळ 24 हजार रुपये दिले. तो अभाविपच्या सर्व कार्यक्रमांना हजर राहायचा आणि सुरतलाही यायचा.
आम्ही कागदपत्रांवर सह्या केल्या. गाडी शर्माच्या नावे करण्यासाठी आम्ही मदत करू, असे आरटीओची कामे करणाऱ्या दलालांनी सांगितले. दरम्यानच्या काळात शर्माच्या घरून मोटारसायकलच चोरी गेली. मग मोटारसायकल चोरी गेल्याची तक्रार त्याने का दिली नाही, असे विचारले असता, ती गाडी माझ्या नावाने नसल्याने तक्रार केली नाही, असा दावा मनोजने केला होता. मनोजला "सिमी' आणि चर्चमधील काही मंडळींनीही लक्ष्य केले होते. कॉंग्रेसच्या एका ख्रिश्चन सदस्याचा खून झाला होता आणि त्या प्रकरणात मनोजचे नाव घुसवण्यात आले. अशा प्रकारे प्रज्ञाची मोटारसायकल त्या "कॅम्प'मध्ये पोहोचली होती. मग मालेगाव स्फोटात ही मोटारसायकल आढळून आली, तेव्हा चेसिस नंबरवरून पोलिसांनी आमचे घर गाठले आणि प्रज्ञाला अटक केली.
9 ऑक्टोबर रोजी दहशतवादविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सामंत हे सुरतमधील आमच्या घरी आले. काही प्रश्न विचारायचे आहेत असे मला म्हणाले. हा चेसिस नंबर असलेली मोटारसायकल कुठे आहे, असे त्यांनी मला विचारले. ती माझी नाही, माझ्या मुलीची आहे, असे मी सांगितले. चार वर्षांपूर्वीच तिने ती विकली. हा प्रश्न का विचारत आहे, हे मी त्या अधिकाऱ्याला विचारले तेव्हा नंतर सांगतो असे तो म्हणाला.
प्रज्ञाचा फोन नंबर त्याने मला विचारला. मी त्याला तो मिळवून दिला. त्याने मोटारसायकलबाबत तिला विचारले असता, काही वर्षांपूर्वी ती माझी होती, नंतर मी ती विकली असे तिने सांगतिले. सुरतला येऊ शकतेस का, असे अधिकाऱ्याने प्रज्ञाला विचारले. प्रज्ञा 12 ऑक्टोबरला मध्यप्रदेशातून आली. पोलिसांनी लागलीच तिला ताब्यात घेतले आणि तिला बेकायदेशीर रीत्या 12 दिवस कोठडीत ठेवले.
मी याबाबत तक्रार केली नाही. कायद्याच्या प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाने सहकार्य केले पाहिजे अशी माझी धारणा आहे. तुम्ही कडक वागू शकता आणि तसे झाले तर तुम्ही प्रामाणिक आहात याचा मला आनंदच होईल, असे मी त्यांना म्हणालो. तुम्ही प्रामाणिक असाल तर मी तुमचे स्वागतच करील. मी तुम्हाला कशाला घाबरू? जे दोषी असतील ते तुम्हाला घाबरतील. मी घाबरण्याचे कारण नाही. प्रज्ञा मला म्हणाली, ""पिताजी, माझा हेतू वाईट नव्हता, मी काहीही चूक केलेली नाही, अशा प्रकारची कल्पनाही कधी माझ्या मनात आली नाही. माझी काळजी करू नका. तुम्ही अगदी तणावमुक्त राहा. या संकटातून मी सहीसलामत परत येईन. माझ्यावर विश्वास ठेवा. जरी मी तुरुंगात असले तरी निर्दोष सिद्ध होऊनच परत येईन.''
प्रज्ञाचे अनेक मित्र-मैत्रिणी ख्रिश्चन व मुसलमान आहेत. माझा हिंदू धर्मावर आणि अहिंसेवरही विश्वास आहे. त्यामुळे माझी मुलगी प्रज्ञा निर्दोष सुटून परत येईल, याची मला खात्री आहे. राजकीय वातावरण तापविण्यासाठीच हे प्रकरण उभे करण्यात आले आहे. सिमी चुकते आहे हे तुम्ही ऐकले आहे?''
डॉ. चंद्रपालसिंग पुढे म्हणतात, ""मी तुम्हाला प्रश्न विचारतो. ज्याचा बॉम्बस्फोटात प्रत्यक्ष संबंध आहे, ती व्यक्ती आपले वाहन वापरू देईल काय? दहशतवादी कृत्यात सहभागी असलेली व्यक्ती सहजासहजी एटीएसच्या बोलावण्यावरून शरण येईल काय? नातेवाईक प्रज्ञाला भेटायला गेले असता, इथे येण्याची गरज काय, माझ्यावर तुमचा विश्वास नाही काय, असा प्रश्न प्रज्ञाने कशाला विचारला असता? एवढेच काय, तर पोलिसांना त्यांचे काम करू द्या, एक दिवस त्यांना मला सोडावेच लागेल, असेही ती म्हणाली होती.
साध्वी असल्याने ती तशीही कमी अन्नग्रहण करते. खाण्यापूर्वी ती पोळी आणि वरण एका छोट्या बाऊलमध्ये एकत्र कुस्करते आणि त्याची चव सौम्य होऊ देते. आता ती तुरुंगात कशी आहे हे मला माहिती नाही. तिने स्वत:ची संघटना स्थापन केली असल्याने तिचा आता अभाविपशी काही संबंध नाही. भारतीय जनता पार्टी आणि विश्व हिंदू परिषदेशी तिचा कधीच संबंध आला नाही. त्यामुळे भाजपा व विहिंपचा दावा खरा आहे. मी संघाचा स्वयंसेवक आहे. पण, संघात स्वयंसेविका नसतात. त्यामुळे तिचा संघाशीही थेट संबंध नाही. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा अभाविपशी संबंध होता आणि प्रज्ञाही अभाविपशी संबंधित होती. त्यामुळे काही कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांच्या भेटी झाल्या होत्या.
काही नेते उघडपणे प्रज्ञाच्या समर्थनार्थ पुढे आले नाहीत, त्यामुळे मी अजीबात विचलित झालेलो नाही. कारण माझ्या मुलीने काहीही चुकीचे केलेले नाही. मालेगाव स्फोटात प्रज्ञाचा हात नाही, याची मला 99 टक्के खात्री आहे. एक टक्का यासाठी नाही कारण, गेल्या दोन वर्षांपासून ती साध्वी आहे आणि ती माझ्या येथील घरी आलेली नाही. कारण साध्वीने आईवडिलांच्या घरी यायचे नसते, असा नियम आहे. ती आता मला "पिताजी' म्हणत नाही आणि त्याऐवजी "डॉक्टरसाब' असे म्हणते.
देशात झालेल्या स्फोटांबाबत ती अस्वस्थ आहे हे मला माहिती आहे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि तो तिला मान्य आहे. नागरिकांनी आधी राष्ट्राचा विचार करावा असे तिला वाटते. भारतात जेव्हा हिंदू राष्ट्र स्थापित होईल, त्या वेळी या भूमीवर कोणतेही पाप होणार नाही असे आम्हाला वाटते. हिंदुत्व हा काही धर्म नाही, तर तो जीवन जगण्याचा एक मार्ग आहे, असे सुप्रीम कोर्टानेही स्पष्ट केले आहे.''
बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलताना डॉ. सिंग म्हणतात, ""ते प्रज्ञाला मदत करीत नाहीत, तर हिंदू मते एकत्रित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कॉंग्रेसही तेच करीत आहे. हे काही योग्य नाही. हिंदू मतपेढी तयार करण्यासाठी ठाकरे प्रज्ञाला पाठिंबा देत आहेत, तर मुसलमानांची मते मिळविण्यासाठी कॉंग्रेस तिचा छळ करीत आहे. कॉंग्रेस काय खेळी खेळत आहे, हे मुस्लिमांना चांगले ठाऊक आहे.
मला मोदींच्याही पाठिंब्याची गरज नाही. मी जर काही अन्याय केला असेल, तर मला त्याची शिक्षा झालीच पाहिजे आणि प्रसंगी फासावरही लटकवले पाहिजे. मी जर काही चुकीचे कृत्य केलेच नाही तर मोदी माझ्या मदतीला न धावले तरीही मी सुरक्षित बाहेर येणारच. गरज आहे ती आत्मविश्वासाची. मी औपचारिकपणे कधीही मोदी यांना भेटलो नाही. पण, ते मला आणि मी त्यांना चांगले ओळखतो. तेही रा. स्व. संघाचे कार्यकर्ते आहेत आणि मी स्वयंसेवक आहे.
मला गरज आहे ती ईश्वराच्या आणि समाजाच्या पाठिंब्याची. माझ्या मुलीने काही चुकीचे कृत्य केले असते तर केव्हातरी तिने त्याबाबत मला सांगितलेच असते. माझ्यापासून काही लपवून ठेवण्याइतपत ती सक्षम नाही. मी मेली तरी चालेल, पण मी बॉम्ब पेरणारच, असे तिने मला सांगितलेच असते. पण तसे तिने केले नाही. म्हणूनच माझी मुलगी निर्दोष आहे, याची मला खात्री आहे.''
(रेडिफवरून साभार)
अनुवाद : गजानन निमदेव

Friday, November 28, 2008

मुंबई वरील हल्ला..हे युद्धच




हे तर युद्धच...
(पान 1 वरून)
येते. हेमंत करकरे तर गेले काही दिवस वादाच्या भोवऱ्यात सापडलेले होते. पण त्यांच्या बलिदानाने त्यांच्याविषयीचा तो वाद आता इतिहासजमा झाला आहे असे म्हणावे लागेल. या तिन्ही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बलिदानाने एकीकडे महाराष्ट्र पोलिसांची शान जरुर वाढली पण त्याचबरोबर त्यांच्या मृत्युने महाराष्ट्र पोलिसात फार मोठी पोकळीही निर्माण झाली आहे.
या हल्ल्याचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून दहशतवादाचा खरा व अतिशय क्रूर चेहरा जगासमोर आला आहे.त्यावर जात, धर्म, देश यांचा शिक्का मारला जातो, पण त्यापैकी कशाचेही दहशतवादाला सोयरसुतक नसते, दहशतवाद हाच त्यांचा धर्म असतो, तीच जात असते व तोच देश असतो. अन्यथा शिकलेसवरले, गोरेगोमटे तरुण या अत्यंत घृणास्पद व्यवहारात सहभागीच झाले नसते.
या हल्ल्यासाठी केंद्र सरकारचे दहशतवादाच्या विरोधातील नेभळट धोरणच मुख्यत: कारणीभूत असले तरी त्याची चर्चा करण्याची आजची वेळ नाही. पण एक बाब आजच आणि आत्ताच नमूद करणेही तेवढेच आवश्यक आहे. ती म्हणजे केंद्र सरकारने आपल्या राजकीय स्वार्थासाठी आरोपित भगव्या दहशतवादाचा शोध घेण्याचा जो बालीश प्रयत्न चालविला होता, त्याचे अपरिहार्य पर्यवसान म्हणजे हा हल्ला होय. आता तरी आपण दहशतवादाचे खरे स्वरुप ओळखले पाहिजे. त्याला धर्माच्या चौकटीत बांधण्याचा प्रयत्न सोडला पाहिजे. आता फक्त दहशतवाद हा दहशतवादच आहे असे समजून त्याला नेस्तनाबूत करण्याची प्रतिज्ञा घेणे आणि व जनता व सरकार यांनी सुरक्षा यंत्रणेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच आजच्या क्षणाची गरज आहे.त्या भावनेतून या संघर्षात प्राणांची आहुती देणारे पोलिस अधिकारी व निरपराध नागरिक यांना श्रध्दांजली अर्पण करु या.

Wednesday, November 19, 2008

कॉंग्रेसजन पापाचे घडे भरत आहेत!

कॉंग्रेसजन पापाचे घडे भरत आहेत!
हिंदुधर्मात दशापराध सांगितले आहेत. मनुष्याने स्वतःची ऐहिक व आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी सांगितलेल्या दहा पापांपासून कसे दूर रहाता येईल, याबाबत सदैव सतर्क रहात त्याने जीवनात मार्गक्रमण करायला हवे. या पृथ्वीतलावर आपण जोवर सजीव स्वरूपात जीवन व्यथित करत आहोत, तोवर सत्‌कर्म करत रहावे. योग्य क्रियमान करत पुण्याचा संचय निर्माण करणे आणि जीवनाच्या अंतिमक्षणाला ही पुण्याची शिदोरी सोबत घेऊन मरणोत्तर मार्गक्रमण करत रहाणे, असा विचार हिंदू धर्माने दिला आहे.
दुर्दैवाने पुरोगामित्वाच्या आहारी गेलेला हिंदू या विचारांशी सलगी ठेवत नाही, त्यामुळे त्याला पाप-पुण्याचा हिशेब यासंबंधी भय उरले नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे दहशतवाद विरोधी पथक आणि कॉंग्रेसजन! एखाद्या दगडालाही पाझर फुटेल, इतका भयंकर अत्याचार दहशतवाद विरोधी पथकाने साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आणि त्यांचे शिष्य भीमभाई या दोघांवर केला आहे.
साध्वी प्रज्ञा सिंग यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, ""10 ऑक्टोबर रोजी एटीएस्‌चे अधिकारी सावंत यांनी मला सूरतला बोलावून घेतले, त्यावेळी मला व शिष्य भीमभाई यांंना ट्रेनने मुंबईत आणले. 12 ते 17 ऑक्टोबर दरम्यान अधिकारी खानविलकर, मिशी असलेले वरिष्ठ अधिकारी व इतरांनी मला रात्रंदिवस प्रचंड मारहाण केली. शिष्य भीमभाईला मला मारण्यास भाग पाडले. तो हळुवार मारहाण करतो; म्हणून खानविलकर यांनी पट्ट्याने दोन्ही हातांवर, पायांवर आणि तळव्यांवर मला व भीमभाई यांना अमानुष मारहाण केली. हातपाय सुजल्याने प्रचंड वेदना होत होत्या; पण वकील, नातलग कुणाशीही माझा संपर्क होऊ दिला नाही. मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणात सहभाग असल्याची कबुली देण्यासाठी हा छळ होत होता.''
हिंदुधर्मात गुरु-शिष्य नाते हे सर्वाधिक पवित्र नाते मानले जाते. शिष्याकरवी गुरूंना मारहाण करण्यास भाग पाडणे, हे टोकाचे क्रौर्य आहे. या पापाचे धनी एटीएस्‌वाले आणि "मतांच्या राजकारणासाठी काहीही करा, हातपाय तोडा, डोकी फोडा; पण साध्वी आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या तोंडून "आम्ही दहशतवादी आहोत', असे वदवून घ्या', असा अट्टाहास धरत एटीएस्‌वाल्यांचा पिच्छा पुरवणारे राष्ट्रवादी कॉंंग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री. शरद पवार व त्यासाठी झटणारे गृहमंत्री श्री. रा.रा. पाटील ही सर्व मंडळी या पापाचे प्रमुख भागीदारी आहेत. हिंदू संत व धर्मगुरु यांची प्रतिमा खराब करून हिंदूंच्या मनामध्ये त्यांचे संत व धर्मगुरु यांच्याविषयी द्वेष निर्माण करायचा आणि मुसलमानांना खुश करून त्यांची मते मिळवायची, अशी राजकीय खेळी यामागे आहे; पण हे कॉंग्रेसजन करायला गेले एक आणि घडतयं एक. निवडणुकांच्या मौसमात अवघ्या देशातून साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या प्रती सहानुभूतीची लाट निर्माण होत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये लोकशाहीप्रती उदासीन राहून कालपर्यंत मतदानाचा दिवस म्हणजे सुटीचा दिवस असे मानणारे हिंदू आतापासूनच मतदानाची प्रतिक्षा करू लागले आहेत. याची झलक कालच जम्मू - काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्याचे मतदान पार पडले, तेव्हा पाहायला मिळाली आहे.
बाबा अमरनाथ मंदिर न्यासाला जागा मिळावी म्हणून काश्मीरखोऱ्यात हिंदूंचे जे उत्स्फूर्त संघटीत आंदोलन 50 दिवस झाले, त्यामुळे तेथील हिंदूंची मानसिकता पूर्णपणे पालटली आहे. मुसलमानी दहशतवादाला घाबरून "काश्मीरमध्ये पुनर्वसनाचा विचार करणे म्हणजे दिवास्वप्न', असे मानणाऱ्या काश्मिरी हिंदूंच्या मनात थेट राजकीय इच्छाशक्ती निर्माण झाली आहे. सत्तेची आस त्यांना खुणावू लागली आहे. त्यामुळे येथे पहिल्या टप्प्यात 55 टक्के मतदान झाले. आता तेथे काश्मिरी हिंदू निवडणूक लढवत आहेत.
आपल्यावर होत असलेल्या अत्याचारांपासून मुक्त होण्यासाठी आता सत्तासंपादन केल्याशिवाय पर्याय नाही, हे हिंदूंना उमगले आहे. कालपर्यंत हिंदूंमध्ये सत्तेबाबत अनास्था निर्माण करून त्यांना मतदानापासून दूर ठेवायचे आणि 13 टक्के मुसलमान, अडीच टक्के खिस्ती व इतर तीन टक्के यांच्या एकगठ्ठा मतांच्या जोरावर 82 टक्के हिंदूंवर राज्य करणारे कॉंगे्रेसजन व त्यांंच्या मित्रपक्षांना या देशातील हिंदूबहुल आता धडा शिकवणार, ही काळ्या दगडावरील रेघ आहे.
साध्वी प्रज्ञा सिंग व स्वामी दयानंद यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित या हिंदूंचे संत आणि सेनाधिकारी यांना बदनाम करून हिंदूंना येणाऱ्या निवडणुकांमध्ये गाडून टाकण्यासाठी कॉंगेे्रसने जो "मालेगाव बॉंबस्फोटा'चा खड्डा खोदला, त्या खड्ड्यात ते स्वतः गाडले जाणार ! ऐहीक प्रगतीच्या मागे धावतांना दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी हे दोन्ही कॉंग्रेस नेत्यांच्या इशाऱ्यावरून जी कृत्ये करत आहेत, त्यातून ते पापाचे घडे भरत आहेत.
राजकारणात नेहमी कमी अधिक होत रहाते. राजकीय वरदहस्ताखाली एटीएसवाल्यांना कदाचित संरक्षण मिळू शकते; पण देवाच्या दरबारात त्यांंना या पापाचा हिशेब द्यावा लागेल, याचे भान त्यांनी ठेवावे !
डॉ. अक्षरा पाटील

Thursday, November 13, 2008

nuclear deal

1, 2, 3 to nuke impotency

Nuclear apartheid ended; energy deal energised; it is 123, now go. The Indian media celebrates the US-India nuclear deal, thus. In contrast, the US State Department, in its press note (October 3, 2008) adds one crucial step to operationalise the deal. And that is the President will make two certifications required under the law. They are: one, that terms of the USIndia deal are consistent with the obligations of the US under the Nuclear Non-Proliferation Treaty (NPT) ; two, that it is the policy of the US to work with the Nuclear Suppliers Group (NSG) to further restrict transfer of equipment and technology related to uranium enrichment and reprocessing of spent fuel; these certificates, read with the 123 agreement, turn a de-facto nuke potent India into nuke impotent India. As if to reaffirm this, Condoleezza Rice, the US Secretary of State, told the media in Delhi on Saturday that the deal would be off if India did a Pokharan again. A shaken Pranab Mukherjee has stepped back, and postponed the signing of the deal that was to coincidewith her visit to Delhi on October 4.
To understand what the certifications by George Bush mean to India, here is the picture of the nuke world, as it stands today.
The world nuke weapons club consists of five nations that had tested nuke bombs before 1967 — starting with the US in 1945, then the USSR, afterwards the UK and finally France and China in 1964.
In 1968 the five-member nuke weapons club initiated a Nuclear Non-Proliferation Treaty (NPT). The NPT backdated the last date for entry into the nuke weapons club as 1.1.1967. The intent was that no other nation could become a nuke weapons power, and so the effect was that the nuke weapons club was to be eternally a five-member club.
All other nations were to be prevented from acquiring nuke weapons thereafter. These nuke impotent nations were required to sign the NPT admitting and declaring themselves as non-nuke states and give up their right to develop nuke weapons. The nuke weapons powers would assure them that they would not nuke the non-nuke weapons nations. The NPT was thus forced on most non-nuke nations by 1970. But India defied; Pakistan and Israel too followed India. India finally dared the five-member club and tested its nuke at Pokharan in 1998, Pakistan followed. So, today you have India, Pakistan and also North Korea, as de-facto nuke weapons powers, but, the NPT records say they have no nukes! The NPT had unjustly divided the world nations into two nuclear castes; one, the nuke weapons states as the higher caste and two, non-nuke weapons states as the lower caste. The status of a nuke weapons state is not just a titular ornamentation like the Padma Awards. The nuke weapons states have set one rule for themselves and another for nuke impotent states. The nuke weapons states could keep on adding to their nuke weapon stockpile, test them and use atomic reactors for civil or military purpose without mandatory inspection by the International Atomic Energy Agency.
IAEA, a UN agency to ensure that civil nuclear reactors are not misused for weaponising programmes, has no power over the reactors of the nuke weapons powers. The duty of the nuke weapons states under the NPT is actually their power to police and ensure that the others perpetually remain non-nuke weapons states, in the lower nuke caste. So, the civil nuclear reactors of nonnuke weapons states are subjected to a safeguards check by the IAEA to rule out stealthy use of the reactors to produce nuclear weapons.Now come to India. For thirty years upto 1998 India, even when it had no weapon, had refused to sign the NPT that would formally declare it nuke impotent.
That’s why it could develop and test the nuke bomb in 1998. But by signing the 123 and IAEA safeguards agreements now, India has formally declared itself as a nonnuke weapons state despite possessing the weapons.
Now have a look at the nuclear weapons stockpile of the nuke high caste nations. In 1968 when the NPT was signed the nonweapons states had 36,633 atomic bombs in stock. The nation-wise tally then was: the US 28,884, the USSR 9,399, the UK 310, France 4 and China 1. After 20 years of the nonproliferation regime, their stockpile of weapons did not fall, but, increased by 2/3 to 61,549 with the US having 23,077, the USSR 37,383, the UK 300, France 410, and China 400. So the five nuke weapons powers kept multiplying their arsenal but condemned others to nuclear impotency! This is precisely why India refused to sign the NPT.
Where does India stand today as a weapons state? In 2000, India’s estimated nuke stockpile was 85 to 90 bombs.With China’s 400 and Pakistan’s estimated 45-90, making a total of almost 500 bombs between them, the weapons ratio is almost 5:1 in their favour, and against India.
So India needs to rapidly add to its stockpile of nuke bombs to balance between itself and its two hostile neighbours. This is precisely what the second certificate of George Bush will stall. Stated in simple terms, India makes nuke bombs by reprocessing the fuel spent at its civil nuclear reactors into plutonium and using the plutonium for the bombs. The second Bush certificate ensures that all NSG nations deny this critical technology to India. The first Bush certificate enforces the non-weapons state norms of the NPT on India. The Bush certificates are diametrically opposite to what the Indian government has been assuring the Indian parliament and the public.
On top of it is the statement by Condoleezza Rice at Delhi warning against nuke test by India. Forget the US, the NSG’s approval is a permit. India has got it. Now it can shop anywhere, particularly in France and Russia, and get supplies; say the apologists of the deal. France and Russia can certainly give technology and reactors.
But what about uranium? The Indian government has repeatedly told Parliament that the deal ensures uninterrupted supply of uranium; a clear misrepresentation.
But, even if it were not, who has the uranium to give? Australia which has over a million tonnes of uranium has said ‘no’ to India. Russia has just 1,78,000 tonnes; US some 1,02,000 tonnes. France, UK and China have no uranium. India has about 78,000 tonnes, with a potential to double it. But how come then France, China, the UK, the USSR and the US, which have no or small uranium stocks, have been able to pile such huge nuke weapons, operate hundreds of reactors? Simple.
Being higher caste nuke nations, the NPT entitles them to get uranium from anywhere and use it for any purpose including for bombs, but denies it to non-weapons states.
This is the advantage a weapons state gets.
Before the 123 deal the nuke club did not accept India as a nuke weapons state. Under the 123 deal India has formally accepted that it is not a nuke weapons state. It has also damaged its capacity to remain a de-facto nuke weapon potent state.Will the UPA government rethink at least now?!

Wednesday, September 10, 2008

शिवराय , आम्हाला क्षमा करा...

सोलापूर येथे २००६ साली संभाजी ब्रिगेडच्या काही लोकांनी सरकारी तिथिनुसार शिवजयंती साजरी करा असा आग्रह धरला होता. त्यासाठी सोलापुरातिल dnyanprabodhini या शालेत हे लोक गेले. तेथे गोंधळ घातला. शाळेत सरस्वतीची मूर्ति असल्याला आक्षेप घेतला. मूर्ति जबरदस्तीने उचलून नेली. या घटनेवर दै. तरुण भारत मधे आम्ही एक अग्रलेख प्रकाशित केला होता. हा अग्रलेख आजही तेवढाच प्रासंगिक आहे आणि शिव धर्माचे थोतांड उघडे पाडणारे आहे.